का केवळ वर्तमानपत्रातल्या तुमच्यासारख्याच तथाकथित शिवप्रेमीनी लिहिलेली बातमी वाचून हे विधान करत आहात?

वर्तमानपत्रात चुकीची बातमी लिहायला तथाकथित शिवप्रेमीच असणे आवश्यक आहे, असे नाही. अर्धवट माहितीवर आणि त्यातून आपल्याला न कळणाऱ्या विषयाबाबत अंदाजपंचे काहीबाही बातमी देणे हे एकंदरीतच (जागतिक) पत्रकारितेत, त्यातून भारतीय पत्रकारितेत आणि त्यातूनही स्थानिकभाषीय वृत्तपत्रांत आज नवीन राहिलेले नाही. "छापलेला शब्द प्रमाण" मानण्याची कुठेच सोय राहिलेली नाही. (तशी सोय कधी होती हा प्रश्नच आहे, पण आजकाल सोय नाही हे समजण्याची तरी थोडीफार अक्कल आलेली असावी, एवढाच फरक!)

- टग्या.