पण चौकडी बाहेरच्या गोष्टींचं प्रतीक म्हणून आपण दारू, सिगरेट याच गोष्टी का निवडाव्यात हे कळत नाही?

वरील वाक्य सागरेश्वर यांच्या प्रतिसादातील, पण येथील टीकाकारांची मुख्य तक्रार दिसते. म्हणून स्वतंत्र प्रतिसाद देतोय.

मला वाटते इथे टीका करणाऱ्या मंडळी (आणि कदाचित सन्जोप राव स्वतःही) चकले आहेत असे वाटते. मुळात या सर्व गोष्टींचे एक सुप्त आकर्षण हा या कवितेचा मुद्दा असावा असे वाटते. ह्या गोष्टी चौकटीबाहेरच्या जीवनाच्या प्रतीकस्वरूप नाहीतच मुळी. मुळात त्या एकसुरी आयुष्यातील अपवाद म्हणून आल्या आहेत. आता अपवाद हा चांगल्या गोष्टींचा असावा वा वाईट गोष्टींचा याबद्दल आपण वाद घालू शकतो, पण कवीने कुठला अपवाद वापरावा हा त्याचा प्रश्न आहे.

 सर्व गोष्टी 'व्यसन' या सदरात मोडणाऱ्या असल्याने त्याबद्दल भीती वा तिरस्कार असतो, पण त्याचबरोबर एक सुप्त आकर्षणही असू शकते, म्हणून 'एकदा करून पाहू' ही इच्छाही. म्हणूनच अपवाद म्हणून एखाद्याच वेळेस ही सुसंस्कारीत मंडळी (मी तथाकथित म्हणत नाही वा कुत्सितपणेही म्हणत नाही) असा अनुभव घेऊन पाहतात. मला वाटते यात अनैसर्गिक वा अनैतिक काही नाही. आणि एरवी हे सर्व करीत नाहीत म्हणून ते सामान्य आहेत असा कार्यकारणभाव यात कुठे (मलातरी) दिसत नाही. असलाच तर एकसुरी आयुष्याबद्दलचा मुद्दा आहे. एका आखल्या रेघेवरून जगण्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे, त्यात व्यसने हा आलेला एक अपवाद आहे इतकेच. त्याचाच मुख्य मुद्दा करून मूळ भावाबद्दल पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

काय सन्जोपराव पटते का?

-विचक्षण