मी ही गोष्ट आधी वाचली होती. बरेचदा बोलताना याचा उदाहरण म्हणून वापर करते. मला ही गोष्ट फार आवडते. तिच्यात २ तात्पर्ये दिसतात --

१. एखादी गोष्ट चांगली की वाईट या बद्दल आपण उगीच judgemental होत असतो. काही वेळेस ती गोष्ट तिथेच सोडून देणे उत्तम असते. त्यावर नाहक विचार करून आपण आपल मन खट्टू करतो व शक्ती वाया घालवतो.

२. एखादी गोष्ट आपल्यालाही करायला मिळाली असती पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे जमले नाही व दुसरा कुणितरी ती करून गेला, अशा परिस्थितीत त्या दुसऱ्या माणसावर खार खाणे व पुन्हा आपलेच मन दूषित करणे. (दुसऱ्या भिख्खू बाबत असे म्हणता येईल)

लिखाळ, ही गोष्ट इथे दिल्याबद्दल धन्यवाद.