प्रियालीताई,
वा! आपण नमूद केलेली तात्पर्ये विचार करण्या सारखीच आहेत. प्रतिसादासाठी आभार.

मला या गोष्टीमध्ये काय जाणवले ते सांगतो. 
येथे दुसरा संन्यासी पूर्णतः ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला आहे. त्याने त्या युवतीला वैषयीक सुखासाठी स्पर्श केलेला नसून पलीकडे नेणे या हेतूने केला होता. युवतीकडे पाहून त्याच्या मानात 'विषय' आलाच नाही. त्यामुळे ती युवती गेल्यावर तो हा प्रसंग विसरून गेला. पण पहिल्या संन्याशाच्या मनात मात्र 'विषय' होता, त्याने तसे प्रतिक्रियेतून सांगितले आणि दिवसभर तो त्यावर चिंतन करीत राहिला.
आपल्या कर्माचे फळ हे हेतूवर आणि त्यामागे आपले मन कशा प्रकारे गुंतले आहे त्यावर असते (असे वाचले आहे). त्यावर ही गोष्ट आधारलेली आहे असे मला वाटते.
--लिखाळ.