येथे दुसरा संन्यासी पूर्णतः ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला आहे.
होय. हे ही खरेच. गोष्टीच खर तात्पर्य हेच असावे. मी फक्त ही गोष्ट इतर कुठल्या प्रकारे घेता येईल ते सांगितले.
जरी पार करून नेणाऱ्याच्या मनात 'विषय' आला तरी तो तेव्हाच निघून गेला. संन्याशी असल्याने "विषय" आलाच नाही असे म्हणणे योग्य.
परंतु सामान्य माणसाबाबतही असेच म्हणता यावे फक्त थोड्या फरकाने-
त्याने (एका सामान्य माणसाने) त्या युवतीला स्पर्श केला त्यातून वैषयिक भावना उत्पन्न झालीही असावी. परंतु ती युवती गेल्यावर तो हा प्रसंग विसरून गेला. पण पहिल्या माणसाच्या मनात मात्र 'विषय' होता, आणि दिवसभर तो त्यावर चिंतन करीत राहिला.
* वैषयिक भावना मनात येणे स्वाभाविक आहे पण त्या भावनेखेरीज दुसरा विचार न सुचणे अस्वाभाविक आहे.