सर्वसाक्षी ह्यांचे देशभक्तांचे स्मरण करणारे हे लेख कोणालाही स्फूर्तिदायक आहेत. त्यांच्या या अनुपम कार्याचे अभिनंदन.
क्रांतीकारी आणि त्यावेळचे पुढारी मंडळी ह्यांच्याबद्दल आधी वरीच चर्चा झालेली दिसते. म्हणजे pro & against अहिंसा. पण लढा, मग तो अन्यायाविरुद्ध असो, स्वातंत्र्यासाठी असो वा सद्यकाळातला अतिरेकी विरुद्ध असो, शांतीने, म. गांधींची जी अहिंसेची व्याख्या होती त्या मार्गाने कधीच सफल होत नाही. नेताजींची 'आझाद हिंद सेना' नसती तर माझ्या मते स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते. कौरवांविरुद्ध युद्ध हे हिंसक कृत्य आहे हे कृष्णालाही मान्य नव्हते. अहिंसेचे पुरस्कर्ते जरा पुढे येऊन अतिरेक्यांच्या तळाला भेट देऊन 'बाबारे, तुम्ही हे (हिंसक कृत्यें) करतां हे बरोबर नाही" हे सांगून त्यांना परावृत्त करा म्हणावे. जर अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे वाटत असेल तर मग त्याच मार्गाने अतिरेक्यांना मार्गावर आणणे फारच सोपे नाही का ?  
विरभि -