विरभि महोदय,

या प्रतिसादातून प्रकट होणाऱ्या तुमच्या विचारांना ,(हिंदू) धार्मिक ग्रंथांच्या व्यासंगाचे पाठबळ लक्षात घेता, एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते असे वाटते. आपल्या विचारांशी सहमत आहे.

हिंसेसाठी केलेली हिंसा, पोट भरण्यासाठी केलेली शिकार आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीयांसाठी केलेली लढाई यात फरक आहे असे वाटते. अहिंसेचे आंधळे प्रतिपादन आणि प्रचार हे दोन्ही प्रकार देशासाठी धोकादायक आहेत असे वाटते. सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवण्यासाठी अहिंसा-सत्याग्रहासारखा प्रभावी मार्ग नाही असे वाटते. पण देशाचे स्वास्थ बिघडवणाऱ्या परकीयांना अहिंसेच्या मार्गाने हुसकून लावणे केवळ अवघडच नाही तर अशक्यही वाटते.