सर्वसाक्षी ह्यांनी मनोगतावर विविध विषयांवर विपुल लेखन केलेले आहे. ह्या त्यांच्या लेखांतून मनोगतींना त्यांच्या ठायीच्या देशभक्तीची धग सतत जाणवलेली आहे. साध्या सोप्या नेहमीच्या भाषेत लिहूनही किती परिणामकारक लिहिता येते, हे त्यांनी लिहिलेले देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करणारे हे लेख वाचून कुणालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही.

पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ही पंधरा पुष्पे गुंफली जात आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

सर्वसाक्षी आणि प्रशासक या दोहोंचे मनापासून आभार.
--लिखाळ.