ऊसापासून साखर बनवताना जी मळी फेकून दिली जाते त्यातून इथेनॉल बनवता येऊ शकते. त्यामुळे एका अर्थाने कचऱ्यातून इंधन आहे. यात न अन्नसुरक्षिततेचा प्रश्न कसा येतो हे समजले नाही.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, (गुजरात?) आणि महाराष्ट्र या राज्यातल्या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊसाची प्रचंड प्रमाणात लागवड गेली अनेक दशके सातत्याने केली आहे असे वाटते.

मळीपासून इथेनॉल बनवल्यामुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव देऊ शकतील असे वाटते. तेच इथेनॉल शेतावरच्या विंधन विहिरी चालवण्यासाठी, ट्रॅक्टर चालवण्यासाठी वापरले गेले तर देशाला नगदी उत्पन्न देणारा आणि परकीय चलनाची बचत करणारा ऊस-साखर-इथेनॉल एक स्वयंपूर्ण उद्योग बनू शकेल असे वाटते.