लग्नानंतर, मुलीने मुलाच्या घरी जाणे ही प्रथा भारतात मानली जाते.

हे बरोबर नाही. बहुतेक पुरूषप्रधान संस्कृतीत ही प्रथा आहे. अतिपूर्वेकडील तसेच भारतातील काही स्त्रीप्रधान जाती जमातींमध्ये लग्न करून मुलगा मुलीच्या घरी जातो असे ऐकले आहे. (चू. भू. दे. घे.)

याचे कारण मला वाटते असे असावे --

मनुष्यसंकृतीचा उदय होत असता, माणसाने जेव्हा शेती किंवा लागवड करायला सुरुवात केली तेंव्हाच प्रजोत्पादनाचा संबंध त्याने स्त्रीशी लावला. हे आपल्या देवी देवतांवरूनही सहज कळून येते. जसे की भूदेवी किंवा देवी लक्ष्मी. जसे शेतीतून काढलेले पीक ही माणसाची संपत्ती आणि या संपत्तीचे रक्षण, पालन पोषण आणि निगा राखण्यासाठी आपल्या जमीनीची काळजी घेणे हे जसे मनुष्याचे कर्तव्य बनले. तसेच प्रजोत्पादन करणारी, आपला वंश पुढे चालवण्यासाठी (जेणे करून शेतीभातीत मदत करण्यास अधिक डोकी लाभतील) स्त्रीची काळजी घेणे, तिचे पालन पोषण करणे याच बरोबर तिला आपल्या अंकित राखणे ही पुरुषाची गरज ठरू लागली. गायीला (पर्यायाने मादीला) देव मानणे ही यातीलच प्रथा.

अर्थातच, मिळकतीचे साधन राखणे व त्यासाठी लागणारी शक्ती ही एकाच कुटुंबातून असावी या भावनेने एकत्र कुटुंबपद्धती सुरू झाली. त्यामुळे नवीन येणाऱ्या स्त्रीमुळे घर तुटू नये, जोडलेले राहावे यातूनच तिने घरातील इतरांशी सेवाभाव दाखवावा ही प्रथा अस्तित्वात आली. 

---

असो. आता परिस्थिती तशी न राहिल्याने एकुलत्या एका मुलीच्या घरी जर लग्न करून एखाद्या मुलाने जाऊन राहायचे ठरवले आणि तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायचे ठरवले तर मला त्यात गैर वाटत नाही. 

One is not born a woman but made. अस वचन वाचल्याचे लक्षात आहे.