वरील सर्व मारामारीवरून एवढेच लक्षात येते की गांधी ('महात्मा' किंवा 'जी' मुद्दामच लावलेला नाही) काय, नेहरू काय, जीना काय, सावरकर काय किंवा आंबेडकर काय, या सर्व सार्वजनिक व्यक्ती असल्यामुळे कोणीही उठावे आणि आपापल्या सोयीप्रमाणे / समजुतीप्रमाणे (beliefs अशा अर्थी) त्यांच्याबाबत काहीही विधाने करावीत, ते बहुधा क्षम्य आहे.
कायद्याबद्दल मला कळत नाही, पण मानहानीच्या संदर्भात खाजगी व्यक्ती आणि सार्वजनिक व्यक्ती यांना कायदा onus of proof च्या दृष्टिकोनातून वेगळा लावला जातो, असे ऐकिवात आहे. (तज्ज्ञांनी खुलासा करावा.) त्यामुळे कोणीही उठावे आणि निर्धास्तपणे काहीही लिहावे.
बरोब्बर. आणखी एक जाणून घ्यायचे आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे.