काय आहे की बरेच जण इथे तिथे व्यग्र आहेत तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पुन्हा मीच देते.
सासु आणि सून यांच नातं कधीच प्रेमळ, शांतीच असु शकत नाही कां?असू शकतं की दोन्ही बाजूंनी सामंजस्य असेल तर त्यात काय कठिण आहे. पण सासू सुनेचं नातं प्रेमळ नसत असा समाजाचा एक 'खोडसाळ' ग्रह आहे.
आता पुरूष ही काय संपत्ती आहे का? तर होय आहे. मुलगी जर परक्याच धन असेल तर मुलगा हा त्या आईचा हक्काचा ठेवा असतो आणि त्यावर घाला घालणारी सून ही हिस्सेदारी मागत असते. विरुद्ध बाजूने सूनेचंही असच होत आणि प्रेमळ नातं दोन्ही बाजूने जोडलं जात नाही.
भांडणं, वाद, मतभेद काय आई-मुलीत होत नाहीत? पण पूर्वग्रह दूषित मते आणि मने यातून सासू सुनेत कटूता निर्माण होते.
पिढीत ले अंतर सोड्ले तर, दोघांच्या सामंजस्यातुन सगळे सुखी राहाणे ईतके अवघड असावे?
पिढीतले अंतर हे सर्वच नात्यांत असते. जसा इतर नात्यांतून यावर सामंजस्याचा मार्ग काढणे आवश्यक आहे तसेच सासू सुनेच्या नात्यातही आहे. सामंजस्यातून सुखी राहाणे कुठल्याही नात्यात अवघड नसते.
पण सामंजस्य दोन्ही बाजूंनी हवे. ते जर नसेल तर वेगळे राहणे सोयिस्कर.
बिचाऱ्या नवऱ्याची होणारी कुचंबणा कशी थांबवावी?
हम्म! नवरे कधीतरी बिचारे होतात कारण इकडे आड तिकडे विहिर अशी गत होते त्यांची. पण बरेच वेळा ते "वाळवंटातल्या वादळात सापडलेल्या उंटासारखे" मान खाली घालून (लपवून) बसतात. (हे वाक्य वाचून माझे बरेच मनोगती मित्र मला धोपटणार बहुतेक :D) त्यापेक्षा निर्णय जर त्यांच्या हातात असेल तर वेगळे राहायला कचरू नये असे वाटते.
क्रुपया, आपले या संदभातील अनुभव आणि त्यावर काढलेला तोडगा सांगावा.माझ्याकडे स्वतःचे असे काहीही अनुभव नाहीत.
---
अवांतरः आपल्या दोन्ही चर्चा पाहता आपल्याला समुपदेशनाची गरज आहे की काय असा प्रश्न मला पडला. या सार्वजनिक मंचावर ते शक्य आहे की काय ते मला सांगता येणार नाही. त्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.