मी अनुजा,सुहासिनी आणि प्रियाली ह्या तिघिंशी सहमत आहे. माझ्या डोळ्यासमोर ३५ वर्षे एका छताखाली राहिलेल्या माझ्या आई व आजीचं उदाहरण आहे.

टाळी एका हातानी वाजत नाही, तसंच सासु-सून नात कोणा एकीच्या पडतं घेण्यानी सावरणार नाही हे दोघींनी लक्षात घेतलं पाहिजे. "आपापसातील direct संवाद " हे नातं टिकवण्याचं गमक असु शकतं. एखाद वेळी सुनेनी स्वतःला न पटलेली गोष्ट केवळ सासुला आवडेल म्हणून केली तरी चालेल तर कधी सासूनी पण काही गोष्टी बदलत्या काळानुसार सुनेच्या मतानी होऊ द्याव्यात.

सासूनी मुलगा-सुन ह्यांचा वाद चालू असल्यास आपलं मत त्यावेळी मांडत बसु नये. तर सुनेनी पण एखादि गोष्ट share करावीशी वाटल्यास सासूजवळ बोलताना आडपडदा ठेऊ नये. त्यामुळे मनं दुखावली जात नाहित.