श्री. गुलाबराव महाराजांनी जन्मांध असून त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली आणि ज्ञानेश्वरीवर भाष्य केले, ५० पुस्तके लिहिली; या सर्व गोष्टी अवघड असल्या तरी अशक्य नाहीत.  अंधत्व असताना केलेली थोर कामे करू शकतात हे हेलन केलर किंवा सूरदासांच्या उदाहरणावरून आपल्याला माहिती आहे.  त्याविरुद्ध कोणी "अविश्वास" दाखवू नये.

मात्र ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदविले या गोष्टीवर अविश्वास दाखविणे योग्य आहे.  कारण रेड्याकडून वेद म्हणवून घेणे हे शक्य नाही.  त्याकडे सत्य मानून न बघता ते एक रूपक आहे असे म्हणा मग कोणताहि वाद होणार नाही.

दुसरी एक शक्यता म्हणजे कुत्र्यांकडून "जिंगल बेल किंवा तत्सम" गाणी म्हणवून घेण्याचे प्रयोग आपण ऐकले असतील.  तद्वत एखादवेळेस रेडा रेकत असता त्याच्या रेकण्याच्या तालासुराला अनुसरून एखादी ऋचा ज्ञानेश्वरांनी म्हणून दाखवून तो रेडाच जणू वेदमंत्र म्हणू शकतो असे त्यांच्यावर "सन्याशाचे पोर" म्हणून वाळीत टाकणाऱ्या ब्रह्मवृंदाला माऊलींनी दर्शविले असेल.  ही गोष्ट शक्य आहे.  परंतु रेडा जाणून बुजून वेदाची एखादी ऋचा किंवा भावगीताची एखादी ओळ म्हणेल यावर विश्वास ठेवणे हे पूर्ण अयोग्य आहे. 

तुम्हाला तरीही त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पोपट त्याच्या घशाच्या रचनेमुळे आणि अनुकरण करण्याच्या स्वभावामुळे मानव सदृश आवाज काढतो.  अशा पोपटाला कोणी विठू म्हणायला शिकवले तर तो योगी होऊ शकणार नाही.

कलोअ,
सुभाष