स्वतःच्या जातीबद्दल जिव्हाळा असू शकतो. प्रत्येक जातीच्या काही सांस्कृतिक परंपरा असतात. खान-पान, वेशभूषा, चालीरीती इत्यादी इत्यादी. त्या जपण्याचा प्रत्येकाला घटनादत्त अधिकार आहे.

पण याउप्पर स्वतःच्या जातीबाबत गर्व करण्यासारखे खरे तर काहीच नाही.

एखाद्या विशिष्ट (उच्चनिंच) जातीत जन्म घेणे हे कुणाच्याही हातात नाही. हे क्वॉलिफिकेशन कसे काय होऊ शकते? हा सूक्ष्म जातीयवादीपणा असू शकतो. कुणी तथाकथित खालच्या जातीत जन्माला आला असता तर त्याने जातीचे गर्वाने घेतले असते असते काय?

शौर्यावर, हुशारीवर, दिलेरीवर किंवा हलकटपणावर, पळपुटेपणावर, नेभळटपणावर, मूर्खपणावर कुठल्याही जातीची , स्त्रीची किंवा पुरुषाची मक्तेदारी (मनॉपली) नसावी असे वाटते. सुभद्राकुमारी चौहानांच्या ओळी आठवा अंग्रेजों के मित्र सिंदिया ने छोड दी राजधानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी.

असो. ह्या असल्या आन-बान-शानच्या गप्पा आधीही निरर्थक होत्या आणि २१ व्या शतकात तर अधिकच निरर्थक आहेत. जग कुठे चालले आहे आणि आम्ही कुठे जातो आहोत?


चित्तरंजन