याचा अर्थ दिवसातून दोन वेळा पठण केले की मग कितीही पापे करावयास मनुष्य मोकळा असा घ्यायचा का?

श्री विनयकराव, 
      कृपया राग मानू नका, पण आपण हे विचारता म्हणून जरा आश्चर्य वाटले (no offence meant). फलश्रुति ही तर आपल्याला प्रत्येक स्तोत्रात आढळतेच. सदा पापी विचारसरणीचा मनुष्य स्तोत्रे (अर्थ जाणून) म्हणायच्या भानगडीत पडेल असे वाटत नाही. आणि जरी (पापे करायला मोकळे अशा विचाराने) पडला तरी स्तोत्रार्थ प्रभवामुळे कालांतराने नक्कीच विचारात फरक पडायला पाहिजे. रावणाला त्याच्या मंत्र्यांपैकी एकाने सुचविले की तू रामाचे वेष घेऊन सीतेजवळ का जात नाहींस ? रावण म्हणाला की मी तो ही प्रयोग करून पाहिला. पण तशी वेषभूषा केल्यावर मी वेषभूषा कशी झाली हे पाहण्याकरतां आरशांत बघितले तर सीतेजवळ दुर्हेतुने जायचा विचारच नाहीसा होतो.
       पापे नाहीसें होतात म्हणून जे म्हटले आहे ती मला वाटते नकळत घडणाऱ्या पापांबद्दल असावे. शिवमानस स्तुति मध्ये शेवटचा श्लोक आठवा. " करचरण कृतं वाक् कायजं कर्मजं वा । श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधम् । विहितम अविहितम् वा हेत सर्वं क्षमस्व ... ". चांगल्या हेतूने मानसपूजा करूनदेखील त्यांना शेवटी अशा प्रार्थनेची गरज का वाटावी ?  अजाणता घडलेली पापकृत्येच ना ? मग हाच आशय स्तोत्रांमध्ये " पापे नाहिशी होतात" असे सांगण्याचा असेल का ? शोध घ्यायला पाहिजे.