सुप्रिया,

सुंदर कविता ! आशयघनता इतकी प्रभावी की ' अंगाभोवती पुरणारी याच्या कुणाचीही चादर नाही ' ही ओळ मनांत घर करून राहते.

कविता जवळ जवळ गझलच्या अंगाने गेली आहे.   पण........ (माफ कर हं ! मी मागच्या जन्मी कावळा असेन बहुदा )   ' गा गा ल गा ल गा गा ' चा छंद पाळता आला  सुंदर गझल लिहू शकशील.

थोडी मोडतोड  करू ?          ........

आता इथें कुणाला, कुणाचीहि कदर नाही

माणूस नांव आहे, माणसांची कणव नाही  

तू गझल छान लिहिशील. मराठी गझल गुरु सुरेश भटांना ओळखतेस ना ?

शुभेच्छा !

अरुण वडुलेकर