भाषा हा वर्गीकरणाचा निकष होऊ शकतो हेच मुळात मला चुकीचे वाटते. वर्गीकरण करताना लावण्याचे निकष त्रिकालाबाधित असायला हवे. भाषा विशिष्ट अंतरावर वा काळानुसार बदलत असते. अशा वेळी त्या त्या बदलांचा परिणाम म्हणून काही वाद निर्माण होणार हे गृहित धरायलाच हवे. त्यातच शिक्षणामुळे व राजकीय अतिजागृततेमुळे वादांची तीवृताही वाढू शकते ही गोष्ट लक्षात घेतली गेली नाही. निकष लावताना नद्या, डोंगर-पर्वत अशा बहुतांशी स्थीर (कारण नद्यांनीही मार्ग बदलल्याचे घडू शकते) असणाऱ्या किंवा अक्षांश-रेखांश यांसारख्या काल्पनिक परंतु सर्वमान्य निकषांचा वापर करता आला असता. (अर्थात अक्षांश-रेखांश यांसारख्या काल्पनिक निकषांचा वापर करून एखादे राज्य वेगळे कसे दाखवायचे हाही एक प्रश्नच पडला असता.)

अवधूत.