सध्याच्या परिस्थितीत बदल करणे आवश्यक असले तरी कितपत शक्य आहे आणि तेही मूठभर मनोगतीना हा मोठा अवघड प्रश्न आहे. झुंडवृत्ती दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि स्वयंघोषित पुढारी त्याला खतपाणी घालण्यातच धन्य मानत आहेत त्यामुळे विवेकी लोकांचा क्षीण आवाज कुणालाही ऐकू येणे शक्य नाही.याला कदाचित पराभूत मनोवृत्ती म्हणावे लागेल पण हीच सत्यपरिस्थिती आहे.