प्रत्येक सण हा व्यापार झाला आहे. या 'धार्मिक' लोकांमुळेच धर्म बदनाम होत आहे. कार्यकर्ते उत्साही नसून गल्लाभरू आहेत.
खरेतर वाहतुकीची समस्या लक्षात घेता सर्व सण, समारंभ मग ते कुठल्याही धर्माचे असोत; रस्त्यावर साजरे करायला कायद्याने बंदी केली पाहिजे. घरात लग्न असले तरी दोन तीन दिवस ढणाणा वाजणारे कर्कश संगीत, रस्ते अडवणाऱ्या मिरवणुका मग सार्वजनिक उत्सवाचे काय विचारता!
कदाचित मुबलक प्रमाणात रिकामटेकडे लोक हेही एक कारण असेल. तुम्हा-आम्हाला असे वर्गणी मागत फिरायला वा रस्त्यात नाचायला वा मांडवात मुक्काम ठोकायला वेळ आहे का?
कोक पेप्सी व माणिकचंदच्या जाहिरातीत झाकोळलेल्या मांडवात देव गुदमरत नसेल?