सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे कटकट असे माझे स्पष्ट मत आहे. गल्लीबोळात बुजबुजलेली मंडळं, तिथले कर्णकर्कश भोंगे, रस्त्यात खणलेले खड्डे, उभारलेले मंडप आणि त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी. अनुराधा पौडवाल दिवसरात्र कानाचा पडदा फाडत असते, ते पुन्हा वेगळे. असह्य.

सार्वजनिक गणेशोत्सव नक्कीच कालबाह्य, विकृतझाला आहे आणि बंद व्हायला हवा.

    अर्थात हे झाले माझे मध्यमवर्गीय, पांढरपेशे विचार.दुसरी बाजू म्हणजे, बहुजनांसाठी हा धांगडधिंगा नसतो. आपलं दुःख आणिवास्तव विसरायला त्यांना जीए, पुलं, वपु, अनिल अवचट मदत करू शकणार नाहीत,हेही सत्यच आहे. त्यासाठी हिमेश रेशमियाच हवा.
   
    समाजाच्या, तरुणाईच्या ऊर्जेच्या सकारात्मक विरेचनासाठी परिस्थितीनिर्माण व्हायलाहवी. पण ही स्थिती निर्माण कशी होणार? त्यासाठी बौद्धिक कुवत वाढायला नको काय? आमच्या शहरांत किती चांगली सार्वजनिकवाचनालये आहेत काय? (आमच्या शहरांत  खेळाची चांगली, मोकळी मैदानेही हवीत.)

शासनाने ह्या मंडळाकडून कर वसूल करावा आणि तो कर सार्वजनिकवाचनालयांसाठी, खेळांच्या मैदानांसाठी वापरावा, असे सुचवावेसे वाटते.



असो. मी गणेशोत्सवात भाग घेत नसतो. हे विधायक कार्य नाही काय?

चित्तरंजन
अवांतर