गणपती हा विघ्नहर्ता आहे , सुखकर्ता दुःखहर्ता आहे इ. सर्व अंधश्रद्धाच आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे या अंधश्रद्धांचा कडेलोट आहे. दूध पिण्यासारखे बुवाछाप चमत्कार करणारा (म्हणजे खरंतर भक्तांना तसे भासते) गणपती बॉम्बस्फोट करणा-या अतिरेक्यांच्या हातातच तो का फोडत नाही? गणपती हा बुद्धीदाता ना? मग तो मुळात अशा लोकांना वाईट कर्म करण्याची बुद्धीच का देतो ? मुशर्र्फ ला हा का बुद्धी देत नाही? की त्याची शक्ती मुसलमानांवर चालतच नाही? विघ्नहर्त्यालाच संरक्षण देण्याची गरज का पडते?

६४ कलांच्या देवाला पूजणा-या या आपल्या देशात प्रचंड निरक्षरता का? इतर तरी अशा किती कलांमध्ये देश अग्रेसर आहे? ती अमेरिका असे कुठलेही अवडंबर न माजवता सर्व क्षेत्रात प्रगत आहे ना?

बरं लोक एकत्र येतात म्हणावं तर असं यातून काय मोठं साध्य झालंय? हिंदूंवर आक्रमणे होतच राहिली. इस्लामी आक्रमण होऊन देश त्यांच्या ताब्यात गेला..इंग्रज आले. पाकिस्तान बनले..कोणत्या देवाने आम्हाला वाचवले? का हीच देवाची इच्छा समजून सर्व सहन करायचे?

बालकाला झोपवून ठेवण्यासाठी अफू दिली जाते तसे या समाजाला झोपवून  धर्म , सण इत्यादी निर्माण झाले आहेत आणि आपन त्यात गुरफटून गेलो आहोत ..दुसरे काय?