विधायक कामे यात माझ्या मते खालील गोष्टी येतात. आणि त्या सुध्दा सामान्य माणसापेक्षा गणेशोत्सव मडंळांनी जर अमलात आणल्या तर त्याचे परिणाम सर्वदूर , लवकर आणि चळवळीच्या रुपात दिसतील. पण मग राजकीय पक्षांना यात काय मलई मिळणार ? खड्य़ांचे म्हणाल तर, दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडले नाहीत तर बरेच संबधित लोक रस्त्यावर येतील त्याचे काय ? ते कोणाचा विचार करो न करो पण त्यांचा विचार जनतेने नाही केला तर कोण करणार ?

१) एका परीसरात एकच मडंळ असावे. त्याकरता काही परिमाण ठरवले जावे, कारण एकाच गल्लीत वेगवेगळी मडंळे गणरायाची स्थापना करतात. टिळकांनी हा उत्सव लोकजागॄती करता केला. लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने चालू झालेला हा उत्सव गल्लीगल्लीत मंडंळे स्थापून लोकांना दुभागतो आहे. मंडंळांनी स्वतःहून याकरता पुढे यावे, उगाच प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये.

२) मुर्तीच्या उंचीवर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या वापरावर सरकारने बंधने आणावीत. मंडंळांनी त्याला केवळ विरोधाकरता विरोध न करता, पर्यावरणाच्या हिताकरता त्याला मान्यता द्यावी. शाडूची किंव्हा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या 'इकोफ्रेंडली' मुर्त्या वापराव्यात.

जोपर्यंत मंडंळे कोणत्याही बदलाला पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत एकट्या दुकट्या माणसाच्या इच्छेपुढे काही होणे नाही. काही अपवादात्मक मंडंळे असतीलही, माझ्या माहिती तरी नाहीत.

माझ्या स्वतःकडे गणपती च नाही तर गौरीसुध्दा येतात, आता त्यांच्या 'इकोफ्रेंडली' पणा बद्द्ल एका वेगळ्या लेखात लिहीन.