डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी बालमृत्यू, बालकुपोषण आणि स्त्री-आरोग्य यांबाबत सुदूर अरण्यात केलेल्या तपश्चर्येबाबत आपण मराठी माणसांनी जास्त कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांची महत्ता बाहेरील लोकांपेक्षा महाराष्ट्र शासनाला आधी जाणवली आणि आणि डॉ.बंग यांना बालकुपोषणावरील समितीचे अध्यक्षपद देऊन शासनाने त्यांचा उचित गौरवच केला असे नव्हे तर बालकुपोषणावर इलाज शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला हे जाणवून मला धन्य वाटले.
धन्य ते डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग. धन्य ते महाराष्ट्र शासन. आणि धन्य आम्ही.
यानिमित्ताने त्यांचे पुन्हश्च हार्दिक अभिनंदन!