कधीतरी इ-मेल मध्ये वाचलेला.
एक दिवस एक गुजराथी, एक उत्तर प्रदेशी आणि एक बिहारी आपापल्या मृत्युनंतर यमराजा समोर उभे ठाकतात. यमराज त्यांना सांगतात, "सध्या चित्रगुप्ताकडे मृतांच्या बऱ्याच फायली बाकी आहेत. तुमचा नंबर लागे पर्यंत नरकयातना लॉज मध्ये तुम्हा सर्वांची सोय करतो, तरी काही विशेष सूचना असतील तर मला सांगा."
सर्वप्रथम गुजराथी तोंड उघडतो, "हे यमभाय, आ मराठी लोको तो मने शांती थी जीवा नथी देता. मारी दुकान फोडी नाखी. आ मराठी माणस तो जंगली छे. मने मारा बाजू मां मराठी माणस नथी जोतो."
आता उत्तर प्रदेशी बोलू लागला, "ठीक कहा गुज्जु भाई ने. श्रीमान यमराजजी, इन मराठी लोगोंने तो हमरा जीना ही मुश्कील कर दिया। हमार दुकान की बोरड भी काला कर दिया। कहत रही की दुकान का नाम मराठी भासा मां चाहिये। अब इ भी कोई बात हुई का? अब हमें भी इ मराठी आदमी बाजू में नही चाहिये।"
आता हे पाहून बिहारी बाबूंनीही तोंड उघडले, "ये दोनो सज्जन आदमी ठीक कहत रहें। अरे, मैं थोडे दिन पहले रेल्वे की परीक्सा देने बंबई गया था। राम लल्ला की सौगंध, इन मराठी लोगोंने हमका बहुतही पीटा। हमरी हड्डी पसली एक कर दी। ऐसा गंवार मराठी आदमी हमरा बाजू मां भी नही चाहिये।"
हे सगळं ऐकताना यमराजांचा चेहरा रागाने फुलत चालला होता. आपल्या खणखणीत आवाजात त्यांनी चित्रगुप्ताला हाळी दिली,
"च्यामारी! चित्र्या, या सगळ्यांच्या फायली घेऊन ये रे माझ्याकडे. बघतो एकेकाला." ;)
प्रियाली.