'काय हो, तुमचे त्या xxx बरोबरचे लफडे चालू आहे का अजून?'
त्या xxx चे नांव सांगा हो. आता याचे उत्तर ही हो, नाही, आणि माहीत नाही मधे देणे तसे कठीणच परंतु समजा दिलेत तरी धुलाई कायमच. ;)
म्हणजे जे धुलाई करायलाच बसले आहेत, त्यांना प्रश्नात स्वारस्य कमी आणि धुलाईत जास्त असते. असो.
मोरोपंत,
अहो विषयांतर करणे, अवांतर लिहीणे, उखाळ्या पाखाळ्या काढणे, कोण कुणाला काय बोलले, जोड्या लावा (कंपूबाजीच्या), कारणे सांगा, कल्पनाविलास करा, संदर्भा सहित स्पष्टीकरण (दुव्यांसकट) हे सर्व करायला अभ्यास आणि कष्ट लागतात. ही काय सोपी कामे वाटली का?
आपण जी चर्चा सुरु केली होती, आम्ही त्यावर मंथन करून कधीच झाले होते. आता प्रामाणिकपणे एखाद्याने "अहो, हा चर्चा विषय या पूर्वी उगाळला होता.. हा घ्या दुवा" असे लिहीले तरी समोरचा, "तुम्हाला काय गरज हे दुवादान करण्याचे?" अशा टाईपचे प्रश्न विचारतात हे पाहण्यात आले आहे. तेव्हा ज्याला जसे उत्तर द्यायचे ते देऊ द्यात की. विषयांतर, अवांतर की आक्षेपार्ह ते ठरवायला प्रशासक समर्थ आहेत.