मराठी माणसाला आजकाल मराठी विषयी किती प्रेम आहे? आपण मराठी आहोत याचा अभिमान आहे का? ते बेळगावचे लोक वेडे आहेत, त्यानी कन्नड शिकून घ्यावे. एक कोल्हापूर सोडले तर कोणाला सीमाप्रश्नाशी घेणेदेणे आहे असे वाटत नाही. राजकारण्याना तर नाहीच नाही.
त्यामुळे वायफळ चर्चा करण्यात, पत्रकबाजी काही अर्थ आहे का? गेले ते दिवस जेंव्हा उभ्या महाराष्ट्रात आंदोलन झाले होते, आजकाल पुण्यामुंबईत राहणारे आम्ही स्वताःच मराठीची गळचेपी करतो तेंव्हा २०० -२५० मैलावर राहणारे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतायत याची जाणीव असायचे काहीच कारण नाही.