अरे बाळा माझ्यासारख्या 'विषयांतरतज्ञाला' तुमच्या "मनोगतवर मजकूर नष्ट करण्याची सोय असावी की नसावी" या प्रश्नालासुद्धा 'हो' किंवा 'नाही' मध्ये उत्तर देता येणार नाही. आम्हाला लगेच प्रश्न पडतात की 'नष्ट कोणी करायचा', 'कुठल्या निकषावर करायचा', काही व्यक्तीनिरपेक्ष निकष हवेत की नकोत. आता काय करायचे? 

मुळात माझा मुद्दा असा होता की इथे चर्चा हाच मुख्य उद्देश असतो. विचारांचे आदानप्रदान व्हावे हा हेतू. कुठलाही निर्णय देण्याचा प्रयत्न का करावा? केला तरी त्याचा उपयोग काय? त्यातून मनोगतींना काय नवीन मिळेल? चर्चेद्वारे अनेक मुद्दे समजतात, क्वचित एखादे संकेतस्थळ, एखादे पुस्तक, एखादा कधी कानावर न पडलेला, वाचण्यात न आलेला मुद्दा समजतो. 

मतचाचणी करायला प्रसारवाहिन्या आणि त्यांची संकेतस्थळे आहेत की.

जे प्रश्न हो किंवा नाही या उत्तरात आटपतात ते मुळात इथे आणूच नयेत असे मला वाटते. अर्थात हा जुनाट विचाराचा काका बरोबर असेल असे नाही हो.

विषयांतर करून प्रश्नाचा बट्ट्याबोळ करण्याचा हेतू नव्हता.

अरेच्या, आयुष्यात पहिल्यांदा विषयाला धरून प्रतिसाद दिला तो तुम्हाला विषयांतर करणारा वाटला की काय? मजा आहे. आम्ही आपले नेहेमीप्रमाणे प्रतिसाद द्यावेत हेच ठीक होईल.

तुझा,

-विचक्षणकाका