कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. माझ्या मनात खालील मुद्दे येतात.
- सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी सुरू केला ते कारण कधीच लोप पावले आहे. त्यांना सुराज्य अपेक्षित होते. पण स्वातंत्र्या नंतर आलेल्या सरकारांनी शिस्तबद्ध समाज रचना करायला हवी होती. ती का नाही झाली वगैरे मुद्दे वेगळ्या चर्चेचे आहेत. पण मुद्दा हा आहे की आजचा धाग़ड धिंगाणा हा त्याचे अपत्य आहे. आज समाजाला कायद्याची भीतीच नाही. प्रत्येक जण हम करे सो कायदा म्हणतो. अंकुश कोणाचाच नाही. मग उगाच दोष त्या नाचणाऱ्यांना का देता? असे ही नाही की त्यात फक्त एकाच प्रकारचे लोक असतात. सगळेच असतात. उगाच मध्यमवर्गियांचा पुळका कशाला? मध्यमवर्गीय म्हणवून घेतले की आपला प्रश्न मिटला का?
- सार्वजनिक कार्यक्रम घडायलाच हवेत. पण जी वर्गणी गोळा होते. जे कार्यक्रम होतात त्याचे परीक्षण व्हायला हवे. मंडळांना काही निर्बंध हवेत. की मंडळाचा आकार किती असावा? किती लोकसंख्येत एक मंडळ असावे? त्यांनी किती वर्गणी गोळा करावी? जी वर्गणी गोळा केली त्याचा ताळेबंद जाहीर करावा. त्या वर्गणी मधला किती भाग उत्सवासाठी खर्च झाला किती विधायक कामे केली? असे बरेच काही करता येईल. जर एखाद्या मंडळाने म्हणजे त्या भागातल्या माणसांनी त्याच भागाचे काही प्रश्न सोडवले जसे रस्ते वा पाणी वा वाहतूक तर त्या भागातल्या घरांना करा मध्ये सवलत. मला वाटत इच्छा शक्ती असेल तर अशा उत्सवांना आता सुद्धा चांगले स्वरूप देता येऊ शकते.
- एकूणच या विषयावर दोन तट दिसतात. एक जे स्वतःला समजापासून वेगळे करून आपल्या पुरता विषय संपवायचा विचार करतात. आणि दुसरे म्हणजे याचा अतिरेक करणारे. जो पर्यंत आपण दोन्ही पैकी एकात आहोत तो पर्यंत याला अंत नाही.
- जर गणेशोत्सव नको तर सार्वजनिक व्यवस्था कशाला हव्यात? आपण सगळेच दुचाक्या घेऊन आपला प्रश्न सोडवू. बस, लोकल हव्या कशाला? जर वीज नसेल तर एखादा दिवस चालते. पण आपल्या भागाला सतत त्रास होऊ लागला तर मग सार्वजनिक आंदोलने हवीत कशाला?
- सरकाराला धारेवर धरणारे अण्णा हजारे आणि असे सामाजिक नेते अशा गोष्टी सुधारायचा विडा का नाही घेत? अमेरिकेला छान म्हणणारे इथे येऊन सुधारणा का नाही करत?
आपण सगळे आत्मकेंद्रीत होत चाललो आहे. सल्ला देणे सर्वात सोपे. गरज आहे ती सुधारणेची आणि त्या साठी असे सार्वजनिक कार्यक्रम हवेत. समाज घडवायचे ते चांगले व्यासपीठ आहे. ते योग्य प्रकारे कसे वापरता येईल याचा आपण विचार करायला हवा.
चाणक्य