बेळगांवपेक्षा 'पुण्याचे खड्डे' हा महाराष्ट्राचा ( आणि आता'मनोगतीचा') जास्त जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. आता हे बेळगावी जनतेचे दुर्देव म्हणावे कि महाराष्ट्राचे? 'पुण्या-मुंबईच्या' प्रश्नांवर नेत्यांना 'उभे गाडण्याची' भाषा करणारे शूरवीर बेळगाव प्रश्नावर का मौन धरतात हे कळत नाही. महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगांव प्रश्नामध्ये किती स्वारस्य आहे ते वेळोवेळी मराठी जनतेनी बघितलेच आहे, आणि जनतेचा 'द्ट्ट्या' पडल्याशिवाय मराठी नेते मंडळी काम करीत नाहीत हेही माहित आहे. मग आता हे घोंगड वाळाव कसं??
मराठी लोकही वाली नाहीत अन पुढारीही ! अशी बेळगांवची अवस्था झाली आहे.