प्रश्न तुमच्यापुरता सोडवून पुरेसे नाही.

प्रश्न आहे तसाच आहे. प्रश्नाचे राजकारण झाले आहे हे मान्य केले तरी प्रश्नाला उत्तर हे हवे आहे.

आपापल्यापुरते प्रश्न सोडवणे हे पलायनवादाचे लक्षण आहे.

अर्थात ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही कुठे मोर्चा किंवा उपोषण करावे असे माझे म्हणणे नाही. पण हा प्रश्न अजून प्रश्नच आहे एवढे जरी तुम्हाला पटले तरी खूप आहे.

आता हा प्रश्न अजूनही का आहे ह्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे.

तुमची तिसरी ओळ पहा.

कर्नाटक सरकारच्या वर्तनामुळेच हा अजूनही प्रश्न आहे. त्यांनी मराठीचा आदर केला असता तरी परिस्थिती वेगळी दिसली असती.

'विश्वची माझे घर' ह्याचा अर्थ असा नव्हे की आपापल्या भाषा विसरणे.

आणि कानडीची जबरदस्ती का म्हणून खपवून घ्यायची?

भाषा ही संस्कृती असते, अस्मिता असते. समाजाचा स्वाभिमान असतो. ही इतकी बारिक-सारिक गोष्ट कधीपासून झाली?

मराठी माणूस आज जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी मराठी जपायचा प्रयत्न करतो. नविन तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठीच्या संवर्धनासाठी धडपडतो. आणि त्याला भारतातल्या एका राज्यात मराठी टिकवण्यासाठी असे भांडावे लागते?

आणि त्याला तुमच्या सारखी माणसे बारिक-सारिक गोष्ट म्हणतात. ह्याचेच नवल वाटते.

युरोपियन समुदायात सुध्दा सर्व देश आपापली भाषा जपून आहेत. त्यांचे चलन एक असले तरी भाषा एक नाही.

तुमच्या विधानाप्रमाणे बेळगावातल्या माणसांनी कानडीचे अत्याचार खपवून घ्यावेत व गप्प बसावे का?