मागे म्हणजे 'गोविंद तळवळकर' हे म.टा. चे संपादक आसतानाचे संपादकीय आठवते .त्यात त्यांनी कर्नाटक ची किनारपट्टी,उत्तर कर्नाटक ,कोंकण गोवा यांचे 'बृहन कोंकण' असावे असा काही प्रस्ताव मांडल्याचे स्मरते. कारण वस्तुतः बेळगाव वजा केला तरी कर्नाटक हे कन्नड ६०%च्या वर बोलले जाणारे राज्य नाही. तिथे तुळु वगैरे भाषा बोलल्या जातात. आपल्या मिलिंद रावांच्या वर्हाडी प्रमाणे आणि विदर्भा प्रमाणे त्यांच्या वरही अन्यायच होत आला आहे.

बाकी बेंगलोर आणि दक्षिण कर्नाटकाने अविकसित भाग ,पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ने अविकसित भागांचे ओझे कशाला डोक्यावर वाहायला हवे?  

पण ते वेडे कर्नाटकाचे लोक ऐतिहासिक काळात विजयनगर साम्राज्याचा भाग असलेल्या बेळगावास कवटाळून बसले आहेत.

बाकी महाराष्ट्राने  काय द्याचे बोलावे अशी त्यांची प्रांजळ इच्छा असल्याचे समजते.

हा महाजन आयोग आणि त्यावरील महाराष्ट्र व म.ए‌‌. स. ची टिपणांचे अधिकृत संदर्भ कुठे उपलब्ध होतील?