.बेळगांवपेक्षा 'पुण्याचे खड्डे' हा महाराष्ट्राचा ( आणि आता'मनोगतीचा') जास्त जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.
हे बेळगावी जनतेचेच दुर्दैव!
त्याचं काय आहे जो प्रश्न डरकाळ्या फ़ोडून /धाक दाखवून सोडवता येतो तोच मोठा/जीवनमरणाचा दाखवायचा(पुण्यातील खड्डे) व ज्या प्रश्नावर अभ्यास लागतो चळवळ उभारवी लागते जनतेचा सहभाग करवावा लागतो,मग तो कितीही न्याय्य असो, कानाडोळा करायचा हा फ़ुडारी बाणा बेळगावच्या मराठी जनतेने ४६ वर्षातल्या ३६ वर्षे तरी पाहिला आहे. तरीही इतकी वर्षे चाललेला संविधानिक व सनदशीर लढा आज महाराष्ट्रात ह. घेण्याचा विषय झालेला आहे. मनोगतावर हा विषय आणून
ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही अशाना एक हलके घ्या म्हणून हलके घेण्याचा विषय मिळाला याचे वाईट वाटते. स्वतः मी सीमाभागातला आहे व म्हणून तेथील दडपशाही काय आहे,मराठीचा टक्का कां कमी होतोय, महाराष्ट्र सरकार व जनता किती गांभीर्याने घेते आहे हे 'चांगलं' जाणतो. या सगळ्याचा वीट येऊन एखाद्याने गजानन महाराजाना साकडे घातले तर त्याच्या/तिच्या अगतिकपणाचा हसायसाठी कसा उपयोग मनोगतावर केला जातोय हे पाहिल्यावर संताप होतो. शिवाय फ़ुग्यात हवा भरायची, मोठा करायचा व फ़ुटला/सुटला की 'आता मी/आम्ही काय करणार' असं कोकलायचं हे बेळगावी जनतेचेच दुर्दैव! यासाठी कुणी उद्या याच धर्तीवर नंदुरबारचे काय हा प्रश्न आणणार/सार्वमताचा प्रश्न, कायम मनपा ते विधानसभा सर्व निवडणुका जिंकणाऱ्या सीमावासी मराठी ना ,लॉस एंजलीस मधे असणाऱ्या विदर्भातील/इंदुरातील (विदर्भातील/इंदुरातील चा उल्लेख फ़क्त जिव्हाळा व जवळीक नसणे हे दाखवण्यासाटःई बरं कां) कुणी क्ष करणार पण आज काय होतय व त्यासाठी आजच उपाय हवा हे महानुभाव ही समजत नाहीत/समजले तरी वागत नाहीत(अपवाद यदि फडके व गणंग अंतुले/छगन/शरद/सर्व मराठी खासदार) हीच सीमावासीयांची रड आहे हो! मदत करता येत नसेल तर टिंगल तरी करु नका हो ! अजून काय लिहू? याविषयावर मला बोलायचं /लिहायचं नसतं पण .......खरं सांगू या चर्चेतला टारगटपणा/टगेपणा/वात्रटपणा/खोपरखळ्या इ इ पाहून राहवलं नाही म्हणून.
जाता जाता पण महत्वाचे
हा कुणाला आकर्षित करण्यासाठी केलेला डाव नाही हो! पोटतिडिकेने लिहलं ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरं !