खालील प्रश्न सरळ मनाने विचारलेला आहे. या प्रश्नात कोणताही खोचकपणा गृहित धरू नये.
बेळगाव आज कर्नाटकात असल्याने मराठी-भाषकांना काय नक्की अडचणी येतात? कानडी सक्तीने शिकावे लागते हे तर समजले. अजून काही तरी नक्कीच असणार.
<खोचकपणा सुरू>
आम्हा मूढ, 'महामूर्ख' व 'बावळट' (हा अस्सल बेळगावी आहेर, बरं का, आजच सकाळी मिळालेला) लोकांना हे समजल्यास कदाचित आमचा दृष्टिकोन बदलेल.
मला एक उमगले नाही. आत्तापर्यंत भेटलेले बरेच 'निप्पाणीसह...' घोषणा देणारे 'मराठी जनते'कडून सहकाराची अपेक्षा करतात, पण त्याच वेळी त्यांनाच करकचून शिव्या देताना मागे-पुढे पहात नाहीत?!!?
</खोचकपणा बंद>
असो, तर आपण हे कळवलेत, तर विषयावर अजून (वेगळा) प्रकाश पडेल.
क. लो. अ.