बेळगाव आज कर्नाटकात असल्याने मराठी-भाषकांना काय नक्की अडचणी येतात?
कानडी सक्तीने शिकावे लागते हे तर समजले. अजून काही तरी नक्कीच असणार.
कानडी शिकण्यात काही अडचण आहे असे नाही. "पण ही किंवा इतर अडचणी आहेत
म्हणून तिथल्या मराठी लोकांना
महाराष्ट्रात यायचे आहे" असा ग्रह का बरे व्हावा? "कर्नाटकात छळ/त्रास
होतो आहे, आणि त्रासापासून सुटका म्हणून त्यांना
महाराष्ट्रात यायचे आहे" असे अजिबात नाही. बेळगाव आणि परिसर
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सांपत्तिक अश्या सर्व क्षेत्रात सुस्थितीत आहे.
महाराष्ट्रात येण्यासाठीची कारणे भावनिक आहेत, अस्मितेशी निगडित
आहेत. (आता पुन्हा "न्यायालयात चालू शकणारा युक्तिवाद"
वगैरे मुद्दे काढू नयेत कारण "सीमाप्रश्नाची कायदेशीर
बाजू" असा चर्चेचा विषय नाही आणि कायदेशीर युक्तिवाद न्यायालयात सुरू
आहेत.)
शिवाय केवळ तिथल्या जनतेला महाराष्ट्रात यायचे आहे असे नाही, महाराष्ट्रानेही त्या भागावर हक्क सांगितला आहे.
आता खोचकपणाविषयी
आत्तापर्यंत भेटलेले बरेच 'निप्पाणीसह...' घोषणा
देणारे 'मराठी जनते'कडून सहकाराची अपेक्षा करतात,
'मराठी जनते'ची व्याख्या फक्त महाराष्ट्रात राहणारे अशीच नाही.
सीमाभागातील 'मराठी जनते'ने महाराष्ट्रात राहणाऱ्या 'मराठी जनते'कडून
सहकाराची अपेक्षा करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. सहकार्य
बंधुत्वाच्या नात्याने करावे, उपकार केल्याची भावना नसावी.
पण त्याच वेळी त्यांनाच
करकचून शिव्या देताना मागे-पुढे पहात नाहीत?!!?
हा असंबद्ध आरोप आहे. सीमाभागातील सगळे मराठी लोक, महाराष्ट्रातील सगळ्या
लोकांना शिव्या देतात असे म्हणायचे आहे का?
उपेक्षा आणि
दुर्लक्ष यासारखा दुसरा अपमान नाही, आणि सीमावासीय 'मराठी लोक' हे
गेली कित्येक दशके सहन करत आहेत. शिवाय करकचून शिव्या देणे हा गल्लीपासून
दिल्लीपर्यंतचा गुणधर्म आहे. असो.