महाशय,

"बाळबोध प्रश्न उपस्थित करणे म्हणजे लाक्षणिक अर्थाने (बघा लक्षात येतो कां ते) पुण्याचे खड्डे जास्त महत्वाचे वाटणे नाही कां !"

नाही बुवा लक्षात येत.

मी हा प्रश्न विचारल्यामुळे मी खड्डेप्रिय झालो हा अचाट तर्क माझ्या बुद्धिपलिकडला आहे!

"त्याचा काय त्रास होतो बुवा काही सुधरत नाही' असं म्हणणं संयुक्तिक...."

याचे उत्तर पुण्यातील लोक देउ शकतील. मी एखाद्या पुणेरीला अद्याप विचारलेले नाही, पण विचारल्यास मला सरळ उत्तर मिळेल अशी खात्री आहे. तुमचे 'उत्तर' मात्र अगदी 'सदाशिव पेठी' वाटते. म्हणजे असे बघा - आपण दोघांनी मिळून ३-४ तास येथे जुगलबंदी करण्यात घालवले. निष्पन्न काय? तोंडची (कळ-पटाची?) वाफ.

आता असे करा - अधिक आढेवेढे न घेता ५ ओळीत प्रश्नाचे उत्तर देउन टाका म्हणजे संपले. जर लिहिणे शक्य नसेल तर दोन-चार दुवे द्या पाठवून वाचायला. नाही तर आपण - मी तुमची आणि तुम्ही माझी - अश्या एकमेकांच्या अकला काढत आयुष्यभर बसू.

तर घ्या तो कळ-पाट आणि करा आमचे अज्ञान दूर!