तुमच्या प्रश्नामागे उपहास, इग्नोरन्स, खोडसाळपणा लपलेला नाही असे गृहीत धरून वरचा प्रतिसाद दिला आहे.
नाही तर,
बेळगाव आज कर्नाटकात असल्याने मराठी-भाषकांना काय नक्की अडचणी येतात? कानडी सक्तीने शिकावे लागते हे तर समजले. अजून काही तरी नक्कीच असणार.
च्या धर्तीवर,
"मुंबई गुजरातमध्ये गेले असते तर मराठी-भाषकांना काय नक्की अडचणी आल्या असत्या? गुजराती शिकावे लागले असते हे तर समजले. अजून काही नक्कीच असणार, उगाच का इतका विरोध केला आणि जीव वगैरे दिले लोकांनी?"
असाही प्रांजळ प्रश्न पडू शकेल. फावल्या वेळात आपल्या दिवाणखान्यात बसल्या बसल्या असे बरेच प्रांजळ प्रश्न पडू शकतील.