शशांक,

तुमचे हे उत्तर पाहण्याच्या आधीच तुमची टिप्प्णी वाचली. म्हणून खालचे उद्विग्न उत्तर. ते सोडुन द्या जमले तर.

न्यायालयाचा मुद्दा काढू नका म्हणलात. तुम्ही न्यायालयात दाद मागायला गेलात तर कायदा न काढून कसे चालणार?

आणि "महाराष्ट्रात येण्यासाठीची कारणे भावनिक आहेत, अस्मितेशी निगडित आहेत." असे असताना मानवी हक्क येतात कोठे?

आत्तापर्यंत भेटलेले बरेच 'निप्पाणीसह...' घोषणा देणारे 'मराठी जनते'कडून सहकाराची अपेक्षा करतात, पण त्याच वेळी त्यांनाच करकचून शिव्या देताना मागे-पुढे पहात नाहीत?!!?

>हा असंबद्ध आरोप आहे. सीमाभागातील सगळे मराठी लोक, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना शिव्या देतात असे म्हणायचे आहे का?

पूर्ण वाक्य वाचा. आत्तापर्यंत भेटलेले बरेच 'निप्पाणीसह...' घोषणा देणारे 'मराठी जनते'कडून सहकाराची

आता मला सांगा तुम्ही अर्थाचा अनर्थ करीत आहात का ते.

असो. बराच वेळ घालवला याच्या मागे. फक्त तुम्ही एक उत्तर दिलेत. त्यानेही समाधान झाले नाही. या गतीने जन्म जायचा नुसता प्रश्न समजून घेण्यात.

मी प्रामाणिकरीत्या प्रयत्न करीत होतो समजून घ्यायचा. पण येथे ते शक्य नाही असे वाटते. साध्या प्रश्नांना तिरक्यातच जाउन उत्तर मिळते. मला वाटले होते ही फक्त 'मधल्या आळीतील लोकांची' खासियत आहे!

जाता जाता एक अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो. ४६ वर्षांपूर्वीचे मुद्दे अधुनमधुन उजळ करावेत. जगातील सर्व मंडळींना आपली भूमिका माहित आहे हे गृहित (आले की नाही 'गृ' लिहिता :-])धरु नये.

कधी आमनेसामने भेटलोच तर तुमच्याशी जरुर याबद्दल बोलेन.

तोपर्यंत रामराम.