कर्ण हा कौंतेय होता हे जर उघड झाले असते तर तिला कर्ण हा एक पांडव म्हणून मान्य करावा लागला असता.
यात अनेक वेगवेगळे मुद्दे आहे. पहिला मुळात ज्यांना आपण पांडव म्हणतो ते पंडुपुत्र या अर्थाने. पण ते पंडुपुत्र नव्हते हे सर्वश्रुत आहे. दुसरा मुद्दा बहुधा तिच्या कर्णाची पत्नी होण्याचा. हा खूपच जर-तर चा आहे असे मला वाटते.
तिला हे 'केव्हा' समजले असते यावर हा मुद्दा खूपच अवलंबून आहे. समजा तिच्या विवाहप्रसंगीच तिला हे ठाऊक असते तर कदाचित ती एकट्या कर्णाची पत्नीही होऊ शकली असती कारण मत्स्यभेदाचा प्रयत्न अन्य पांडवांपूर्वी त्यानेच केला होता (आणि ज्येष्ठ बंधू म्हणून त्या परिस्थितीतही तो क्रम बदलला नसताच). जर असे असते तर पुढे काय झाले असते हा स्वैर तर्काला उधाण आणणारा मुद्दा. जर युद्धाच्या तोंडावर तिला हे 'सत्य' कळते तरीही त्यामुळे कर्णाचा तिच्यावर पती म्हणून अधिकार (सर्व स्त्री मनोगतींनो माफ करा) कसा सिद्ध होतो? एकदा तिचा निर्णयाचा अधिकार कुंतीने नाकारला म्हणून काय झाले, ती काय पांडवांची वा कुंतीची खासगी मालमत्त होती काय, की आला आणखी एक भाऊ तर घ्या वाटून. पुन्हा युद्धप्रसंगी या सर्व मंडळींची असलेली वये लक्षात घेतली तर हा मुद्दा सर्वस्वी गैरलागू ठरतो.
कृष्णाने कर्णाला दाखवलेली द्रौपदीची लालूच ही अन्य दृष्टीने पहावी. द्रौपदीने तिच्या विवाहप्रसंगी केलेला कर्णाचा अपमान या निमित्ताने धूवून काढण्याचा हा प्रतीकात्मक प्रस्ताव मानावा. त्या वयात होणारे त्यांचे लग्न हे कर्णाची सूडपूर्तीहून अधिक काही सिद्ध करणारे नव्हते.
असो.
-विचक्षण