महाभारताची कोणतीही प्रत वाचली तरी त्यातील रूपकांचा अर्थ समजावून देण्यास अधिकारी व्यक्तीच हवी.उदाहरणार्थ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे दशावतार पुस्तक वाचेपर्यंत इंद्राने अहिल्येवर बलात्कार केला असेच मी समजत होतो .
"अहिल्यायै जारः इंद्रः।" चा वर वर अर्थ पाहिला तर इंद्राने अहिल्येशी व्यभिचार केला असा होतो.पण अहिल्या या शब्दातील अहः म्हणजे दिवस. लुनाति म्हण्जे तोडतो आणि जारः म्हणजे जीर्ण करतो.त्यानुसार दिवस तोडणाऱ्या रात्रीला जीर्ण करणारा (निस्तेज करणारा)सूर्योदय झाला असा सरळ अर्थ आहे.यात कोठेही इंद्राची गोष्ट नाही.(संदर्भ दशावतार सतरावी आवृत्ती पृ.क्र.१९)याच पुढे त्यानी ब्रह्मदेवाने आपल्या कन्येवर मोहित होऊन तिच्यावर बलत्कार केला या समजुतीचे खंडन करून तेही रूपक असून त्याचा खरा अर्थ काय आहे हे दिले आहे.जिज्ञासूनी ते वाचावे.