विश्वनाथ खैऱ्यांच्या संमत विचारातही महाभारत, रामायणासारख्या काव्यांत इतिहास पाहू नये, केवळ मिथ्यकथा (myths) म्हणून पहावे असे ते सांगतात. पुष्ट्यर्थ अनेकानेक उदाहरणे देतात. उदा.

"... पृथ म्हणजे हाताचा तळवा. त्याची पाच बोटं म्हणजे 'पृथे'चे-कुंतीचे पाच मुलगे. आकाशातली 'कन्या', तेजस्वी तारका चित्रा. शेजारच्या हस्त नक्षत्राचे पाच अंधुक तारे. हस्त वरून हस्तिनापूर ..." वगैरे.

मला वाटते पारंपारिक मिथ्यकथा आणि सांप्रत वास्तव यांचा मेळ घालून व्यास, वाल्मिकी आदींनी महाभारत, रामायण वगैरे लिहिले असावे.