महाभारतात रुपके आहेत हे मान्य. काव्यात्मक स्वरुपामुळे अनेक अलंकारांचा वापरही मान्य. परंतु संस्कृतात एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात त्यावरून "अहिल्यायै जारः इंद्रः।" चा अर्थ लावलेला पटत नाही कारण मूळ कथेचा उत्तरार्ध/ पूर्वार्ध त्यात बसत नाही.

बरेचदा असं वाटतं की आमची संस्कृती 'लई भारी' होती हा दाखवून देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण कुठेतरी ताळमेळ बसत नाही. असो. असं म्हणून आपला मुद्दा खोडून काढावा तर "तू शीला हो" अस सांगताना गौतम मुनींनी तिला तू दगड हो न सांगता तू जाणून बुजून इंद्राशी संग केलास तेव्हा आता पुन्हा सत्वशील हो असे सांगितले तर त्यावर विश्वास बसतो. कारण इथे अद्भुताचा सरळ अर्थ काढून सांगितलेला आहे.

महाभारत फक्त काव्य आहे यावर विश्वास ठेवणे मला कठिण वाटते. या काव्यात 'अतिशयोक्ती' अलंकाराचा वापर मात्र पटतो.

इतिहास की काव्य यावर हा लेख वाचता येईल.