मला वाटतं अहल्या (अहिल्या??), गौतम आणि इंद्र यांची कथा रामायणात येते. महाभारतात नाही.
अहिल्यायै जारः इंद्रः। याचा संदर्भ दशावतार सतरावी आवृत्ती पृ.क्र.१९ असा आपण दिला आहे. मी तज्ज्ञांनी निश्चित केलेली वाल्मिकी रामायणाची महाजालावरील आवृत्ती तपासून पाहिली असता हा श्लोक मिळाला नाही.
बालकांडात जे श्लोक मिळाले त्यात विश्वामित्रांनी रामाला सांगितलेली गौतम अहल्येची साग्रसंगित कथा आहे. ज्यात गौतमांनी अहल्येला
इह वर्ष सहस्राणि बहुनि निवशिस्यसि ॥ १-४८-२९ (माझ्या अत्यल्प संस्कृत ज्ञानाची चूक माफ करा)
निवशिस्यसि चा अर्थ मागे राहा (to linger in expectation) असा आढळून आला.
तेव्हा अहिल्यायै जारः इंद्रः। याचा खरेपणा (authenticity) कसा तपासायचा?