मी अहिल्येचे उदाहरण फक्त रूपकाचा अर्थ कसा लावतात हे दाखवण्याच्या दृष्टीने दिले होते.ते रामायण अथवा महाभारत यात आहे असे म्हटले नाही.

नाही. क्षणभर माझाच गोंधळ झाला होता. (महाभारतात कुठे आलं हे असा) म्हणून तसे लिहीले. आपण केवळ रुपक या अर्थी दिले होते ते मान्य.

परंतु,

प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे लेखन बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले असून ते बरेचदा biased असल्याचे मला जाणवले. (चू. भू. दे. घे. हे माझे व्यक्तिगत मत असून कुणाला दुखवण्याचा हेतू नाही). मला त्यांनी काढलेल्या संस्कृत अर्थाबद्दल अजिबात संदेह नाही.

पण मूळ वाल्मिकी रामायणात हा श्लोक आढळला नाही. तेंव्हा खरे कोण वाल्मिकी की आठवले? (चू. भू. दे. घे.)

अवांतरः

हे मी उद्धटपणे लिहीलेले नाही मला पडलेला प्रश्न खरा आहे. बरेचदा विद्वान आपल्यापरीने संस्कृतचा अर्थ लावतात कारण एकापेक्षा अधिक अर्थ निघतात पण तपासून पाहिले असता त्यातील फोलपणा लक्षात येतो. बलात्काराच्या, व्याभिचाराच्या घटना आमच्या देशांत, संस्कृतीत घडतच नव्हत्या असा केविलवाणा दावा केला जातो. मूळ रामायणात येणारे इंद्र आणि अहल्या यांच्यातले संवाद बऱ्यापैकी शृंगारीक आहेत. तेंव्हा पहाट वगैरे अजिबात पटले नाही.

मला हे सांगावेसे वाटले म्हणून लिहीत आहे. तरीही हा विषय इथेच थांबवलेला बरा असे वाटते. असो.