अद्वैताच्या प्राप्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत. काही तरी केले म्हणजे काहीतरी आपोआप होईल हा अंधविश्वास असू नये.  

अगदी बरोबर बोललात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणारा तो साधक. त्याला गणपति "बसवावा" लागतोच असे नाही. बव्हंशी काहीतरी करतात ते परंपरा वगैरे म्हणून. तिथे बरेच वेळेला आपण जे करतोय ते विश्वासाने का अंधविश्वासाने हा विचार तरी मनात येतो का ? जाऊ द्या. उगाच वाद निर्माण करणारा प्रश्न आहे.

याचा अर्थ द्वैतापासून कुणालाही (भगवंतालासुद्धा) सुटका नाही असा होतो.

हो. हे ही बरोबर. पण मला वाटते थोडा फरक आहे. अद्वैतरूपी "आनंद" (happiness आणि joy मध्ये जो फरक आहे तसा योग्य शब्द आठवत नाही) स्थिती प्राप्त झाली असता द्वैतामध्ये/मधून स्वेच्छेने जाता/येता येत असावे. तिथे संसार बंधक नसतो. अर्थात् हे माझे मत झाले.