पांडवांच्या इंद्रप्रस्थनगरी झालेल्या 'राजसुय' यज्ञाचा यज्ञवेत्ता म्हणुन श्रीकृष्णाची निवड पांडवांनी केली.परंतु हे चेदी या देशाचा राजा असलेल्या शिशुपालाला सहन झाले नाही.'सभागृहात एवढे क्षत्रिय उपस्थित असताना, गायींच्या मागे शेपट्या पिरगाळत रानोमाळी हिंडणार्या एका गोपालपुत्राची निवड करतोस?" अशी श्रीकृष्णाची बरीच मानहानी केली.शिशुपालाचे १०० अपराध पोटात घेईन असे श्रीकृष्णाने शिशुपालाच्या आईला वचन दिले होते.परंतू १०० अपराध भरल्यामुळे त्याने शिशुपालाचा सुदर्शनचक्र सोडुन वध केला. ( बहुतेक, शिशुपाल आणि कृष्ण यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते. चु.भु.द्या. घ्या. )
संदर्भ - मृत्युंजय.