आत्ता पर्यंत वरील चर्चेत उल्लेख आला की नाही ते माहीत नाही कारण मी आत्ताच यात "लक्ष" घातले आहे! पण दाजीशास्त्री पणशीकरांची महाभारतावरची पुस्तके पण वाचण्याजोगी आहेतः (१) महाभारत एक सुडाचा प्रवास आणि (२) कर्ण खरा कोण होता.

खूप वर्षांपुर्वी माघी गणेशोत्सवात ठाण्याला त्यांचे भाषण ऐकले होते आणि खूप आवडले होते. त्यात त्यांनी सांगीतलेला एक मुद्दा इथल्या चालू असलेल्या वादाच्या बाबतित सांगतोः त्यांना कोणी तरी विचारले की त्यांच्या पुस्तकाच्या मागे संदर्भसुची कशी नाही? त्यावर ते उत्तरले की फक्त व्यासांनी लिहीलेल्या महाभारताची (सर्वमान्य) प्रत हाच काय तो संदर्भ...

कर्ण कुंतिचा मुलगा होता का नाही वगैरे विचार करत असताना एक डोक्यात ठेवावे की आपण व्यासांच्या महाभारता बद्दल बोलतोय का कशाबद्दल? व्यासांनी लिहिलेली ही एक तत्कालीन इतिहासावरील कादंबरी असे मानले तरी फक्त तोच काय तो एक संदर्भ आहे आणि त्यात म्हटल्यावर आपणपण कर्ण हा कुंतिपूत्र मानणे महत्त्वाचे ठरते.