जर महाभारत हा इतिहास नसून काव्य आहे हे गृहीत धरले तर गीता हि व्यासांनी लिहिली म्हणणे योग्य आहे का?
महाभारत हे काव्य आहे का "जय नावाचा इतिहास" ह्यातील कुठलेही सत्य असले तरी तार्कीक दृष्ट्या आपण वाचत असलेली शब्दरूप गीता ही व्यासांनीच लिहीली असावी असे वाटते. विचार करा युद्धभूमीवर श्रीकृष्ण-अर्जून एव्हढा सगळा संवाद करत बसलेत! मला तर वाटते कृष्ण म्हणाला असेल की मुकाट्याने लढायला लाग आत्ता वेळ नाही नंतर सगळं सांगतो!
महाभारतात जशी गीता आहे तसेच युद्धाअखेरीस शांतीपर्वात भीमाने युधिष्ठराला असेच तत्वज्ञान सांगीतले आहे.