कोर्डेकाका
आपल्या संस्कारात मूळ मुद्दा आहे तो स्वतःचे पाय जमीनीवर ठेवायची जाणीव करून देणे हा. आपले संस्कार (कर्मकांड नव्हे) आणि पुराणातील गोष्टी या शर्करावेष्ठीत औषधाच्या गोळ्या म्हणून माना आणि सध्याच्या काळाला अनुरूप तार्किकपणातून न पाहता गर्भितार्थ म्हणून समजा. त्यामुळे "आवाहनम न जानामी..." म्हणताना त्यात देवाविषयीची भिती नसून आपण स्वतःला सांगत असतो की आपण स्वतःला काही फार शहाणे समजण्याची गरज नाही. बाकी देव काय मानण्यावर आहे. त्याचे केले जाणारे उत्सव वगैरे तर त्याही पुढची गोष्ट...पण विनय, संयम इत्यादी समाजात वावरताना लागणारे गुण हे वास्तव आहे आणि ते प्रयत्नाने आत्मसात करावे लागतात...
विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हणाले आहे की रस्त्यावरच्या भिकाऱ्याला दान देतानापण त्याच्यापेक्षा थोडे खाली उभे राहून करा जेणे करून आपल्यातला अहंभाव कमी राहील आणि जाणिव राहील की त्याच्यामुळे आपल्याला पुण्य लाभते आहे. - (कृपया हे उदाहरण आहे हे समजा... भिकारी, समाज वगैरे साठी चर्चेचा विषय म्हणून नाही!)