कंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला.

कौंडिण्याने समुद्रमार्गे आजच्या कम्बोडियाला जाऊन आपले राज्य तिथे स्थापन केले. तसेच जावाचे हिंदू राज्यकर्तेही मुळात समुद्रमार्गेच तिथे गेले असावेत.

(यातील मूळ गृहीतक: हिंदू संस्कृती ही आजच्या भारतातून या देशांत पसरली. अर्थात या उलट जरी झाले असले तरी फरक पडू नये; कोणाला तरी कुठून तरी समुद्रमार्गेच जावे लागले असते - विशेषतः जावाच्या बाबतीत.)

याचा अर्थ तत्कालीन हिंदू संस्कृतीत / "धर्मशास्त्रा"त समुद्रउल्लंघन निषिद्ध नसावे असा घ्यावा का? तसे असल्यास हा निर्बंध नेमका कधी आणि कोणत्या कारणास्तव आला असावा? (लोकमान्यांना विलायतेवरून परत आल्यावर पुणेरी ब्राह्मणांच्या आग्रहाखाली [दडपणाखाली?] शुद्धी करून घ्यावी लागली होती, असं ऐकिवात आहे. अमेरिकेतून परतल्यावर डॉ. आनंदीबाई जोशींच्या झालेल्या छळाबद्दलही ऐकलेले आहे.) आणि एकेकाळी अतिपूर्वेपर्यंत पसरलेल्या आणि भरभराटीला आलेल्या हिंदू संस्कृतीच्या पुढील ऱ्हासासाठी / विस्तार थांबण्यासाठी (इतर अनेक कारणांबरोबरच) हा निर्बंधही कारणीभूत झाला असू शकेल का?

बाकी लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण. पुढील भागांसाठी उत्सुक.